✍️गणिताशी गट्टी क्र.१५✍️
✍️ राम सरकत्या जिन्यावरून १ सेकंदाला १ पायरी या वेगाने चढत आहे. २५ पायऱ्या चढल्यानंतर तो जिन्याच्या वरच्या टोकाला पोहोचला. राम वळून पुन्हा त्याच जिन्यावरून १ सेकंदाला ३ पायऱ्या या वेगाने धावत त्या जिन्यावरून उतरू लागला असता त्याला खाली पोहोचण्यासाठी ७५ पायऱ्या उतराव्या लागल्या. जर जिना चालू नसेल तर रामला किती पायऱ्या चढाव्या लागतील?
( टीप : वर सरकत जाणाऱ्या जिन्यावरून खाली धावत येणे धोकादायक आहे.कृपया वाचकांनी हे साहस करू नये.)
➡️ जिना बंद असताना त्याला एकूण x पायऱ्या आहेत
तर जिन्याचा वेग y पायरी प्रति सेकंद आहे असे मानू.
पहिल्या अटीवरून ,
x = २५ + २५y …….( i )
दुसऱ्या अटीवरून,
x = ७५ – २५y.. …..( ii )
➡️ समीकरण ( i ) व समीकरण ( ii ) वरून
२५ + २५y = ७५ – २५y
२५y + २५y = ७५ – २५
५०y = ५०
y = ५०/५०
y = १
म्हणून,
x = २५ + २५ × १
x = २५ + २५
x = ५०
➡️म्हणून जिना चालू नसेल तर रामला ५० पायऱ्या चढाव्या लागतील.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

