✍️गणिताशी गट्टी क्र.२२✍️
✍️प्रवाशांनी भरलेली जलद ठाणे लोकल पनवेल स्टेशनवरून निघाली. खारघर रेल्वेस्थानकात त्या ट्रेनमधून एक तृतीयांश प्रवासी उतरले तर २८० प्रवाशी चढले. बेलापूरला ट्रेनमधील निम्मे प्रवासी उतरले तर १२ प्रवासी चढले. तांत्रिक बिघाडामुळे ती लोकल नेरुळ येथे रद्द केली तेंव्हा तिच्यात २४८ प्रवासी होते. तर त्या लोकलमध्ये सुरुवातीला किती प्रवासी होते?
➡️सुरुवातीला त्या लोकलमध्ये x प्रवासी होते असे मानू.
खारघर रेल्वेस्थानकातून गाडी निघाली तेंव्हा तिच्यातील एकूण प्रवासी
= ( x – १x/३) + २८०
= [( ३x – १x )/३ ] + २८०
= (२x/३) + २८०
= (२x + ८४०)/३
➡️बेलापूर रेल्वेस्थानकातून गाडी निघाली तेंव्हा तिच्यातील एकूण प्रवासी
= [(२x + ८४०)/३ – १/२ (२x + ८४०)/३] + १२
= [२(२x + ८४०)/६ – (२x + ८४०)/६] + १२
= [ (४x + १६८० – २x – ८४०) /६] + १२
= [(२x + ८४०) /६] + १२
= [२(x + ४२०)/६] + १२
=[(x + ४२०)/३] + १२
➡️नेरुळ स्थानकात गाडी रद्द झाली तेंव्हा तिच्यात २४८ प्रवासी होते.
म्हणून,
[(x + ४२०)/३] + १२ = २४८
[(x + ४२०)/३] = २४८ – १२
x + ४२० = २३६ × ३
x = ७०८ – ४२०
➡️x = २८८
➡️म्हणून त्या लोकलमध्ये सुरुवातीला २८८ प्रवासी होते.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

