✍️गणिताशी गट्टी क्र-१७✍️
✍️सोहन, मोहन , रोहन यांच्या वजनाची सरासरी ८४ किलो आहे. तर सोहन, मोहन , रोहन आणि राजन यांच्या वजनाची सरासरी ८० किलो आहे. राजनपेक्षा तीन किलो वजन जास्त असलेल्या राघवने सोहनची जागा घेतली तर त्या चौघांच्या ( राजन, राघव, मोहन, रोहन ) वजनाची सरासरी ७९ किलो होते. तर सोहनचे वजन किती किलो आहे?
➡️सोहनचे वजन x किलो , मोहनचे वजन y किलो , रोहनचे वजन z किलो , राजनचे वजन m किलो तर राघवचे वजन n किलो मानू.
➡️पहिल्या अटीवरून,
(x+y+z) / ३ = ८४
x+y+z = ८४×३
x+y+z = २५२ ……..(i)
➡️दुसऱ्या अटीवरून,
(m+x+y+z)/४ = ८०
m+x+y+z = ८०×४
m + २५२ = ३२० …..( i वरून )
m = ३२० – २५२
m = ६८ किलो.
म्हणून राजन चे वजन ६८ किलो आहे.
राघवचे वजन राजन पेक्षा ३ किलोने जास्त आहे.
म्हणून राघवचे वजन = m = ६८+३ = ७१ किलो.
➡️तिसऱ्या अटीवरून,
(m+n+y+z)/४ = ७९
६८+७१+y+z = ७९×४
१३९ +y+z = ३१६
y+z = ३१६ – १३९
y+ z = १७७ …….( ii )
➡️म्हणून
x+१७७ = २५२ …..( i व ii वरून)
x = २५२ – १७७
x = ७५ किलो
म्हणून सोहनचे वजन ७५ किलो आहे.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

