✍️गणिताशी गट्टी क्र-१८✍️
✍️संजय, सुजय आणि विजय अनुक्रमे ३, ४ आणि ५ किमी प्रतितास या वेगाने चालतात. ते पनवेलहुन अनुक्रमे ३, ४ आणि ५ वाजता पुण्याच्या दिशेने निघाले. जेंव्हा सुजय संजयला गाठतो तेंव्हा लगेच तो त्याला ( संजयला ) विजयसाठी संदेश देऊन परत पाठवतो तर विजयला तो संदेश किती वाजता मिळाला असेल ?
➡️ वेग = अंतर/काळ हे सूत्र आपल्याला माहिती आहेच.
सुजय संजयला x किमी अंतरावर गाठतो असे मानू.
संजयला तेवढे अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ = x/३ तास
सुजयला तेच अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ = x/४ तास
परंतु सुजय संजयपेक्षा एक तास उशिरा निघाला होता.
➡️ म्हणून दिलेल्या अटीवरून,
(x/३) – (x/४) = १
(४x – ३x) / १२ = १
x = १२ किमी.
➡️ म्हणून सुजय संजयला पनवेलपासून १२ किमी अंतरावर गाठतो.
एवढे अंतर चालण्यासाठी संजयला १२/३ म्हणजेच ४ तास लागले.
➡️ संजय तीन वाजता पनवेलहुन निघाला होता.
म्हणून सुजयने संजयला (३+४) = ७ वाजता गाठले.
पाच वाजता पनवेलहुन निघालेल्या विजयने तोपर्यंत१० किमी अंतर कापले होते.
➡️म्हणजेच सात वाजता विजय आणि संजय एकमेकांपासून (१२-१०) = २ किमी अंतरावर होते.
➡️दोघांची चालण्याची दिशा परस्परविरुद्ध असल्याने सापेक्ष वेग (३+५) = ८ किमी प्रतितास राहील.
➡️म्हणून ते २ किमी अंतर कापण्यासाठी त्यांना लागलेला वेळ
= २/८ तास
=१/४ तास
= (१/४) × ६० मिनिटे
= १५ मिनिटे.
➡️म्हणून संजय विजयला ७:१५ वाजता संदेश देईल.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

