✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. २५✍️
✍️एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व म्हशी आहेत तसेच जितके बैल आहेत त्याच्या दुप्पट गायी आहेत. बैलांची संख्या म्हशींच्या संख्येपेक्षा एकने जास्त आहे. जर पाळीव पशूं (कोंबड्यासहित) च्या पायांची संख्या पाळीव प्राण्यांच्या (कोंबड्यासहित ) एकूण संख्येच्या दुपटीपेक्षा ३० ने जास्त असेल तर त्या शेतकऱ्याकडे किती गायी आहेत? (टीप : एकही प्राणी पायाने अधू नाही. )
➡️ बैलांची संख्या x तर कोंबड्याची संख्या y मानू.
म्हणून गायींची संख्या = २x
म्हशींची संख्या = x – १
म्हशींची संख्या = x – १
➡️ दिलेल्या अटीवरून,
४x + ४(x-१) + ४(२x) + २y = २(x + x-१ + २x + y ) + ३०
४x + ४x – ४ + ८x + २y = २( ४x + y – १) + ३०
१६x + २y – ४ = ८x + २y – २ +३०
१६x – ८x = २८ + ४
८x = ३२
x = ३२/८
➡️ x = ४
म्हणून गायींची संख्या
= २x
= २ × ४
= ८
➡️ म्हणून त्या शेतकऱ्याकडे ८ गायी आहेत.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

